पीक विमा
आताच भरा यावर क्लिक करा
आता फक्त 1 रुपयात मिळणार पीक विमा.
• पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विमा मिळणार आहे
नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपया मध्ये मिळणारी पीक विमा हि योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती मित्रांनो मी तुम्हांला सांगणार आहे तर तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा.
पीक विमा:
चला तर मग मित्रांनो बघूया नेमकी काय आहे 1 रुपया मध्ये मिळणारी ही पीक विमा योजना आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे.
कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल, इत्यादी सर्व माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.
पीक विमा योजनेचा लाभ; केवळ एक रुपयात त्यामुळेच
लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा ;
पीक विमा म्हणजे काय ?
नैसर्गिक आपत्ती , कीड्यामुळे आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा सरंक्षण देणे व पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती तही शेतकऱ्यांचे आर्थिक मदद करने .
राज्यात उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते.
पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विमा मिळणार आहे
मा. वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस महोदय सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतक-यांना केवळ रु. 1 भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता एक रुपयात पीक विमा या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याकरीता शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. ३० मे या दिवशी मान्यता प्रदान करण्यात आली
पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विमा मिळणार आहे
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल.
● ही योजना बिगर कर्जदार शेतकन्यांसाठी ऐच्छिक आहे, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी
भाडेकरार आवश्यक आहे.
3 वर्षासाठी 1 रुपयात पीक विमा लागू
31 जुलै 2023 पर्यत पीक विमा पोर्टलवर अर्ज करावा.
याची सर्व शेतकरी बांधवांनी
नोंद घ्यावी.




